Sunday, May 29, 2011

ब्राह्मण हरवला आहे

"ब्राम्हण हरवला आहे"
लेखक - मनोज शिवराम लोंढे

स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते.

कांबळे: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर हजारो वर्षे अन्याय केलात,
आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत.
इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे.
आम्ही अजून काही पिढ्या अंधारात खिचपत पडलो असतो.

जोशी: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरच!! पण अन्याय फक्त ब्राम्हणांनी केला
का? इंग्रजांच्या राज्यात जातीयवाद करणे चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले.
त्यांनी समाजप्रबोधन केले. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का?

कांबळे: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.
जोशी: हो बरोबर आहे. पण अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झाले नाहीत?
कांबळे: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?

जोशी: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव,
तुकाराम, रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी
एकोप्याने, समतेने, गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले
ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राम्हण होते.

कांबळे: हे बाकी खर जोशी. महाराष्ट्रात कधीही अमानुषता नव्हती. "मानवता धर्म" हाच श्रेष्ठ
धर्म मानला जात आला आहे.

जोशी: अगदी बरोबर. ह्यात शिवाजी महाराज आणि संत मंडळी ह्याचं मोठ, "नव्हे", त्यांचंच
१००% योगदान आहे. महाराजांनी सुलतानी संकटे आपल्या समर्थ बाहूंनी पेलली आणि
प्रजेला सुरक्षित केले, अभय दिले.

कांबळे: अगदी बरोबर. महाराजांनी परकीय आक्रमकापासून स्वकीय जनतेचे रक्षण केले, आणि संतांनी मानवतावाद मराठी जनतेच्या नसानसात बिंबवला.
जोशी: क्या बात है कांबळे!! जीते रहो!!

कांबळे: पुढे इंग्रज आले, आणि स्वतःबरोबर युरोपातील आधुनिक विचार यथे घेऊन आले.
Equality, fraternity, freedom. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य.

जोशी: काय गम्मत आहे नाही!! स्वतः भारतीयांना गुलामीत जोखाडायचे, काला कुत्ता म्हणून
हिणवायचे, आणि इंग्लंडमधील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे गोडवे गायचे. अहो
कांबळे, इंग्रजांनी आपल्याला लुटलं, नागवल हे सत्य आहे. स्वतःच राज्य सुरळीत चालावं,
म्हणून भारतीय समाजातील जातीभेद व प्रांतभेद ह्या दुफळीचा त्यांनी यथेच्छ फायदा घेतला.
स्वतःच्या फायद्यासाठी येथील जातीभेदावर वारंवार टीका करू लागले. ब्राम्हणांना झोडपू
लागले. कारण अगदी Alexander च्या काळापासून परकीयांनी ओळखले होते की ब्राम्हणांना
वेगळे पाडले, त्यांना झोडपले की भारतावर बिनदिक्कत राज्य करता येते.

कांबळे: पण इंग्रजांमुळेच आपल्या समाजात समता येऊ लागली.
जोशी: थांबा !! हे अर्धसत्य आहे. इंग्रजांच्या काळात समता येऊ लागली हे खर पण इंग्रजामुळे समता आली हे खोटे. त्याकाळातील आपल्या विचारवंतांनी इंग्रजी विचार वाचले, इंग्रजी शिक्षण घेतले आणि त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. हे विचारवंत कोण होते?
कांबळे: फुले, आंबेडकर, शाहू महाराज दुसर कोण?
जोशी: Hmm!! अहो कांबळे, फुले ह्यांच्या बरोबरीने लोकहितवादी देशमुख, आगरकर, रानडे, रेवेरंड टिळक ह्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांच्या बरोबरीने, सावरकरही जातीवादावर प्रखर आसूड ओढत असत. सावरकरांनी स्पष्ट सांगितले होते, की जातीवाद हा हिंदूधर्माला लागलेला काळा डाग आहे. आणि तो पुसण्याकरता, आपापसात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. सावरकरांनी दलितांबरोबर सहभोजने केली होती, त्यांना मंदीर प्रवेश मिळवून दिला होता.
कांबळे: ठीक आहे जोशी, सावरकरांनी देशाकरता, समाजाकरता खूप केले. आणि त्यांना बदनाम केले गेले, आणि अजून केले जाते. पण मला सांगा, किती भटांनी दलितांशी लग्ने केली?
जोशी : सगळ्यात प्रसिद्ध उदाहरणे द्यायची तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पत्नी जातीने ब्राह्मण होत्या. श्री रामदास आठवले ह्यांच्या पत्नी माहेरच्या काशीकर ह्या जातीने ब्राह्मण होत्या. श्री रामदास आठवले ह्याचे सासरे श्री काशीकर ब्राह्मण होते व त्यांनी ३०/ ४० वर्षांपूर्वी एका दलित कन्येशी विवाह केला होता. ही ठळक उदाहरणे झाली. अशी शेकड्यावारी उदाहरणे मी तुम्हाला देऊ शकतो. “Cast is no longer an issue for brahmins”. आता मला सांगा, की किती "ब्राह्मणेतर" उच्चवर्णीयांनी दलितांशी लग्ने केली आहेत?
कांबळे : फारच थोडे. अहो जोशी आमच्यातल्याच पोटजातींमध्ये अजून आपापसात लग्ने होत नाहीत.
जोशी: आता मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो. मी तुमच्याबरोबर ९-१० वर्ष काम करतो आहे; तुमच्याबरोबर जेवतो, हास्यविनोद करतो. मी तुमच्यावर कधी अन्याय केला? अन्याय सोडा हो, दुजाभाव तरी केला का कधी ?
कांबळे: नाही, कधीच नाही. आपण दोघे अत्यंत चांगले मित्र आहोत. आपण अडीअडचणीच्यावेळी
एकमेकांना मदत करतो. पण जोशी आता आमच्यावर कोणी अन्याय करूच शकणार नाही.
आमच्यापाठी कायदा खंबीरपणे उभा आहे.

जोशी: बर!! धरून चाला, की माझ्या मनात खर तर तुमच्यावर अन्याय करायचा आहे, पण
तुमच्या मागील कायद्याच्या पाठबळामुळे, घाबरून, मी तुमच्यावर अन्याय करत नाही आहे.
मला सांगा, तुमच्या वडिलांवर कोणा ब्राम्हणाने अन्याय केला का?
कांबळे: नाही. उलट त्यांचे सर्व चांगले शिक्षक आणि चांगले मित्र भटच होते. आणि म्हणूनच माझे
वडील शिकून मोठे वकील झाले.

जोशी: अजून एक प्रश्न. तुमच्या आजोबांवर कोणी ब्राम्हणांनी अत्याचार केला का?

कांबळे: नाही जोशी. माझे आजोबा म्हणत की, भट म्हणजे देव मानस. भट चांगले संस्कार
करतात. चांगले काय वाईट काय ते शिकवतात.

जोशी: अहो कांबळे, मग तुम्ही स्वतःवर, स्वतःच्या वडिलांवर व आजोबांवर अविश्वास दाखवून,
स्वार्थी, फसव्या अशा पुढार्यांवर विश्वास ठेऊन, ब्राम्हणांनी अन्याय केला, असा ओरडा का
करता?

कांबळे: अहो जोशी, अजून खैरलांजीसारखी प्रकरणे होतातच ना? दलितांवर अत्याचार अजून होताच
आहेत ना?

जोशी: खैरलांजीचा अत्याचार करणाऱ्यात ब्राम्हण होते का? एकही नव्हता. हे मी नाही सांगत,
सरकारी पुरावे बोलत आहेत.

कांबळे: (अचंबित झाले आहेत) जोशी बरोबर बोलता आहात तुम्ही.

जोशी: हल्ली काय झालं आहे, कोणीही उठावे, आणि ब्राम्हणाच्या टपलीत मारून जावे अशी परिस्थिती
आहे. कारण ब्राम्हण कुणाच्या अध्यात ना मध्यात. काहीच बोलत नाही.
आपल्याच कोषात निपचित पडलाय. आपण बर; आपल “शिक्षण” बर, आपल काम बर, आपल कुटुंब बर आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बरे.
कांबळे: अहो, म्हणजेच भट स्वकेंद्री झालाय; कुठे आग लागली काय किंवा वणवा पेटला काय.
भटाला त्याचे सोयर - सूतक नसते. भट आणि त्याच कुटुंब. अगदी संदीप खरे म्हणतात
तसा, "भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत".
जोशी: ब्राम्हण असे का झाले? ह्याचा विचार केलात? हा विचार केलात तर तुम्हाला त्याची कारणे लक्षात येतील. स्वातंत्र्यसंग्रामात कोण अग्रेसर होते हो? महाराष्ट्रापुरत बोलायचं झाल्यास!!
कांबळे: वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, सावरकर, कान्हेरे, गोखले, आगरकर,
एस एम जोशी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन.

जोशी: बस! बस! एव्हढी नावे पुरे आहेत. ही सर्व मंडळी जातीने कोण होती? हे सगळे ब्राम्हण
होते. ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाची, संसाराची होळी केली, जेणेकरून समस्त भारतीयांना
दिवाळी साजरी करता येईल. त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला.

कांबळे: (पुन्हा निःशब्द) पण जोशी, गांधीजींना गोडसेने मारले. तोही भटच होता.
जोशी: गोडसेने गांधीजींची हत्या केली. त्यानंतर गावोगावी ब्राम्हणांची घर जाळली गेली, सावरकरांच्या लहान भावाची, दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. एका माणसाच्या चूकीने हजारो ब्राम्हणांचे निःस्वार्थी बलिदान फोल ठरले. आणि मग पेशवाईला बदनाम करण्याची चढाओढ लागली.
कांबळे: पण रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई, आणि पर्यायाने मराठ्यांचं राज्य
बुडवलच ना?

जोशी: हा एक “typical dialogue” आहे. अरे पण त्या आधी बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव,
नानासाहेब, माधवराव, ह्यांनी स्वतः छत्रपती न होता, छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पिढ्या न पिढ्या इमाने - इतबारे कारभार केलाच ना? आणि रघुनाथरावांनीसुद्धा अटकेपार म्हणजे
अफगाणिस्थान पर्यंत मराठी सत्ता नेली. पहिल्या बाजीरावाचे युद्धातील डावपेच अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकवले जातात, आणि महाराष्ट्रात त्या महान अजिंक्य योद्ध्याला बदफैली म्हणून हिणवले जाते. महाराजांना ब्राम्हण देवासारखे पूजतात. पण पेशव्यांचा मात्र कोणी आदर करत नाही. उलट त्यांना बदनाम केले जाते.

कांबळे: (अचंबित झाले आहेत) भट एव्हढे पराक्रमी, निःस्वार्थी होते, तर ते आता समाजकारणात,
राजकारणात का येत नाहीत.

जोशी: ब्राम्हण समाजकारणातून बाहेर नाही. हां तो राजकारणातून निश्चित बाहेर पडला आहे.
ह्याला कारण, आमच्यावरील राजकीय बहिष्कार म्हणा, किंवा ब्राम्हण स्वतः कोषात गेला
म्हणा. ब्राम्हणांनी विचार केला, की देशासाठी एव्हढा स्वार्थत्याग, बलिदान करून पदरी काय
पडल? अवहेलना? तिरस्कार? त्यापेक्षा आपण बर, आपल कुटुंब बर.

कांबळे: ओहो!! मला हे कधी जाणवलच नाही. मी नेहेमी भटांच्या आपण बर आपल कुटुंब बर ह्या
वृत्तीला शिव्या घालत आलो आहे. पण ह्या वृत्तीमागील कारण काय ते आज तुमच्याकडून
कळल्यावर मला भटांबद्दल आदर वाटू लागला आहे. पण जोशी, ही वृत्ती चुकीची नाही वाटत
तुम्हाला. भटांनी, त्यांना लोकांनी काही बोलल तरी, समाजाला चांगल मार्गदर्शन करण्याचा वसा घेतलाच पाहिजे. थोडक्यात नेतृत्वाचा त्याग करून, महाराष्ट्राचं व पर्यायाने देशाच नुकसान केल आहे असेच म्हणावे लागेल. कारण निःस्वार्थी, चांगले लोक राजकारणापासून दूर राहिले आणि स्वार्थी, पुढाऱ्यांची अनिर्बंध सत्ता सुरु झाली. हे देशाला, समाजाला घातक आहे. निःस्वार्थी, पापभिरू, पुण्यवान माणसांनी राजकारणात, समाजकारणात यायलाच हवे.
जोशी: आज इतकी वाईट परिस्थिती आहे की , २६/११ नंतर लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचार न करता, महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांच्या पाळलेल्या लोकांकरवी ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद उकरला. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या थोर इतिहास अभ्यासकाच्या शिवाजी महाराजांवरील भक्तीवर त्यांनी लांच्छन उडवली. दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरु नव्हतेच असा जावई-शोध लावून दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून ह्यांनी काढले. आता तर त्यांनी पालिकेत ठराव करून लाल महालातूनही पुतळा काढून टाकला आहे.
कांबळे: जेम्स लेनच्या कानाशी भांडारकर institute मधल्या काही लोकांनी घाणेरडी कुजबुज केली आणि त्या लेनने पुस्तकात काही बाही लिहिले म्हणून लोक चिडले.
जोशी: चिडलच पाहिजे. अशी निर्लज्ज कुजबुज करणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे आणि जेम्स लेनचे पुस्तक “Hindu King in Islamic India” कायमचे “BAN” केले पाहिजे. पण ह्यात दादोजीना मरणोत्तर शिक्षा का म्हणून? त्यांनी शहाजीराजे, जिजाऊसाहेब आणि महाराजांची इमाने इतबारे सेवा केली म्हणून? बर हे लोक फक्त दादोजींवर थांबणारे नाहीत. ह्यांच्या दृष्टीने, रामदासस्वामी व महाराज एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. त्यामुळे, रामदासस्वामी हे महाराजांचे राजकीय आणि आध्यात्मिक गुरु नव्हतेच मुळी. वाह! किती शोध लावले काही मर्यादाच ठेवली नाही.
कांबळे: अहो जोशी, पण तुकोबांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठवले होते. तुकाराम
महाराजांनी शिवाजीराजांना सांगितले की, “राजकारण माझी प्रवृत्ती नाही. सुलतानी
आक्रमणापासून रयतेचे रक्षण करून स्वराज्य स्थापन करायचे असल्यास गुरु म्हणून समर्थ
रामदासच योग्य आहेत. त्यामुळे राजे तुम्ही त्यांच्याकडे जा” असा योग्य सल्ला दिला होता.

जोशी : पण ज्यांना २६/११ पासून लोकांचे लक्ष्य हटवायचे होते, त्यांना अशा जाती भेदासारख्याच
गोष्टी सुचणार दुसर काय.

कांबळे: पण भटांनी ह्यावर कुठेच आवाज उठवला नाही.
जोशी: ब्राम्हणांनी "मौनं खलु साधनं" हे व्रत घेतलं आहे अस समजा हव तर. मी तर सर्व ब्राह्मण संस्थांना असे आव्हान करतो आहे की त्यांनी सर्व ब्राह्मण युग पुरुषांचे सार्वजनिक जागांवरचे पुतळे स्वतः होऊन हलवावेत आणि संस्थेच्या आवारात आदराने सुरक्षित ठेवावेत. कारण मराठी जनतेच्या मनात जातीभेदाचे विष कालावणाऱ्या ह्या पापी भ्रष्ट पुढारी लोकांचे हात आज न उद्या ह्या पुतळ्यांवर पण पडणार आहेत.
कांबळे: अहो, पण हे घातक आहे. चुकीचा किंवा सोयीचा इतिहास मुलांना शिकवण हे पाप आहे.
जोशी: हल्ली पाप - पुण्य, खर - खोट अस काही राहील आहे अस वाटत तुम्हाला? गुंड बदमाश
आमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.

कांबळे: नाही जोशी, भटांनी समाजकारणात व राजकारणात परतायला हव. ही राजकारणात
पसरलेली घाण दूर करायला हवी. निःस्वार्थी, शिकलेले सवरलेले लोक राजकारणात यायला
हवेत तरच समाज ह्यातून वाचेल आणि देशाच कल्याण होईल, खरी समता साधेल.
जोशी: चला तुम्हाला माझे विचार पटले, बर वाटल. सत्याची बाजू मी व्यवस्थित मांडली. आता
ब्राम्हणांनी राजकारणात उतरून आज पसरलेली घाण साफ कारण आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे. ही जबाबदारी ब्राम्हण स्वीकारतील अगदी गेला बाजार” निवडणूक प्रक्रीयेमध्ये सक्रीय होतील अशी मला अशा वाटते. स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात बोलणे व स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर
येण्याची सुरुवात इथूनच होईल असा विश्वास वाटतो आहे.

मनोज लोंढे
mslondhe@rediffmail.com

No comments:

Post a Comment